हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – Pune ( नवी दिल्ली ) –देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झालीत पण पारधी समाज अजूनही मुख्य प्रवाहात आला नाही , अजूनही हा समाज पोलीस आणि प्रशासनाच्या अत्याचाराचे लक्ष होत आहे ,या समाजाला अजूनही मुख्य प्रवाहात आणण्यात यश आलेले नाही , अजूनही राष्ट्रपती निर्देशित राज्यसभा सदस्यत्व किंवा राज्यपाल निर्देशित विधानपरिषदेचे सद्स्त्यव देण्यात आलेले नाही असे का?असा स्पष्ट आणि लिखित सवाल पुण्यातील माजी नगरसेविका राजश्री काळे यांनी राष्ट्रपतींच्या भेटीत लिखित स्वरुपात राष्ट्रपतींना केला आहे.
आदिवासीसमाजासाठी राबविण्यात येणाऱ्या ध्येयधोरणाबाबत चर्चा करण्यासाठी सोमवार (दि. २१) रोजी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनातील बैठकीसाठी भाजपच्या माजी नगरसेविका राजश्री काळे यांना निमंत्रण पाठविण्यात आले होते . पारधी समाजासाठी काळे यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन या बैठकीसाठी त्यांना बोलाविले होते . राष्ट्रपती भवनात विविध क्षेत्रांतील प्रख्यात आदिवासी व्यक्तींशी संवाद साधला आणि आदिवासी समुदायां बाबत अधिक प्रभावी धोरणे आणि उपक्रम यावर राष्ट्रपती चर्चा केली .राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांची भेट घेऊन त्यांनी यावेळी त्यांच्याशी संवाद साधला .
अजूनही पारधी समाजाला खित्या गुन्ह्यात अडकविणे, कुठेही गुन्हा घडला तर त्रास देणे असे प्रकार पोलिसांकडून होतात , अजूनही या समाजाला राहायला देशात घर, जमीन मिळणे मुश्कील झालेले आहे . ते राहतात तिथेच तीच त्यांना जमीन देण्यात यावी आणि शेती करू द्यावी तसेच शैक्षणिक सुविधा पुरवून या समाजाला मुख्य प्रवाहात आणावे अशा मागण्या यावेळी राजश्री काळे यांनी केल्या .
प्रतिनिधी – गणेश मारुती जोशी..














